कळसातील पाणी

लग्न म्हणजे हजार प्रथा … विधी . त्यातील एक म्हणजे कळस … तसं पाहायला गेल तर बोहल्यावर चढणाऱ्या मुलीच्या अंगावर २ वेळा हे कळसातील पाणी पडत . एक म्हणजे लग्नाच्या आधी एक दिवस … हळदीच्या वेळी आणि दुसर म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी …. सासरी 

लहानपणी पडणाऱ्या बालीश प्रश्नांपैकी हा एक प्रश्न … का घालत असतील नवरी मुलीला कळसात पाणी ? आणि ते ही  २ वेळा ??  
पण म्हणतात ना …… अशा गोष्टींचा अर्थ लागायला कळसातील पाणी पडाव लागत डोक्यावर 

खरच या सगळ्या प्रथा नुसत्या प्रथा नाहीत तर त्या मागे फार मोठा अर्थ असतो . बस , तो अर्थ कुरवाळून समजावून सांगणारी एक आई नशिबाला असावी लागते . जी मला लाभली . 

इतके वर्ष न राहवून ' तो ' बालीश प्रश्न शेवटी मी तिला विचारला … माझं लग्न ४ दिवसांवर असताना . टपोऱ्या डोळ्यात पाणी आणून पदराची सावली देत जवळ घेऊन तिने जे मला सांगितल ते आयुष्यभर असं च्या असं मनात साठून राहील माझ्या :)

डोळ्यातल्या पाण्याला वाट करून देत आई बोलत होती 

देव जेव्हा प्रत्येकाच्या नशिबात प्रेम वाटत असतो तेव्हा ज्याच्या झोळीत तो मुठभर प्रेम जास्त घालतो त्याला मुलीचा जन्म मिळतो . मुलीला जन्मजातच सगळ्या गोष्टी २ - २ मिळालेल्या असतात . २ घर , सासू म्हणजे आई आणि सासरा म्हणजे बाबा , म्हणून २ आई बाबा , लाडक्या दिरासारखा अजून एक मित्र , नणंदे सारखी मैत्रीण  . मग इतक्या सगळ्या गोष्टी २ असताना कळसातील पाणी एकच कस असेल ??

पहिला कळस माहेरचा. आईच बोट धरून चालशील … शेवटच …. उद्यापासून नवऱ्याच बोट धरून चालायचं  , पाहिलं पाणी आईच्या अंगावरून ओघळून मुलीच्या अंगावर पडत . 

ते पाणी तिला सगळ्या जुन्या गोष्टी पदरात बांधून घ्यायला सांगत आणि उरल्या सुरल्या कळसात सोडून जायला सांगत .

  

- आईची माया पदराच्या टोकाला बांधून ने …. सासरच्या उंबऱ्यावर ही गाठ सोडून मग आत प्रवेश कर , अंगणापासून तुझ्या प्रेमाची लयलूट होऊ दे 

- ज्यांच्या बोटाला धरून पाहिलं पाऊल टाकलस त्या बाबांचे लाड मुठीत गच्च मिटून सांभाळून ने .  सासरी कधी एकटी पडलीस तर ही मुठ तुला कधीही एकट सोडून जाणार नाही . डोळ्यातलं पाणी पुसायला बाबाचा हात पुढे येईल 

-  बहिणीची माया कमरेला गुंडाळून ठेव . मणका दुखेतोवर काम करताना तिच्या गोंडस आठवणी भार हलका करायला कामी येतील 

-  बंधुराज तुझ्यापेक्षा धाकटा असला तरी तुझ्यापेक्षा मोठा होवून आजवर तुझी सावली सुद्धा सांभाळली . त्याचा मोठेपणा मुंडावळ्या सोबत कपाळाभोवती गाठवून घे . घराच्या ४ भिंती एकत्र ठेवायला तुलाही कधीतरी मोठ व्हावं लागेल . मोठेपणाने बरच काही पोटात घ्यावं लागेल , बरच काही विसरावं लागेल . तेव्हा होईलच की  आठवण भावाची …. तुझा शब्द कधीही नाही मोडला त्याने 

- बाकी राहिलं ते चिंचेच्या झाडाखालच बालपण, कैरीच्या फोडेसाठीची भांडण , सायकल शिकताना मैत्रिणीने आधारासाठी दिलेला हात, आजी सोडून गेली तेव्हा मन मोकळ करायला दिलेला तिचा खांदा , तुझ्यासाठी जागवलेल्या रात्री आणि बरच काही ……. जे सगळ आज या कळसातल्या पाण्याबरोबर वाहून जाईल . इथेच सोडून जाव लागेल तुला हे सगळ

दुसरा कळस सासरचा , लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पाणी नवऱ्याच्या अंगावरून ओघळून तुला भिजवेल 


   
ते पाणी तुला सगळ सगळ नव्याने करायची शक्ती देईल . नव घर उभ करायची ताकद देईल 

- नवऱ्याच्या प्रेमाने चिंब भिजशील तरच सगळ पेलता येईल .  

- दिराच्या सुखासाठी बाप्पाकडे रोज मस्तक टेकव.  हिरव्या चुड्याच्या किणकिण आवाजासाहित तो तुझे मोकळे दिवस परत आणून देईल  

- नणंदेच्या गप्पांसाठी तुझी दुपार राखून ठेव . बघ …. सगळा क्षीण निघून जाईल 

- सगळ्याच सासवा खाष्ट नसतात ग . . . कळसातल्या पाण्याने जड झालेली साडी तुला हेच सांगेल . आता कामाचं वजन वाढलाय वहिनीसाहेब …. नीरी सांभाळून पाऊल टाका . वाट दाखवायला ही माउली कधीही तयार असेल 

- आणि सासरा म्हणजे तुझ हक्काच लाडाच अकाउंट. मुलगी म्हणून घरात घेतील आणि प्रत्येक वेळी बापाच्या मायेने पाठीशी घालतील   

:)

दोन्ही कळसात चिंब भिजलीस तरच संसारात चांगली मुरवतीची होशील :) आणि हो … कळस उचलताना तुझ्या अंगाला त्याचा स्पर्श नाही होऊ द्यायचा 
आपल कोंदण आपण जपायचं … आपल्या माणसासाठी :) 

View Facebook Comments


2 comments:

  1. Very nice post .. I guess this is secret of your happy married life

    End statement is awesome आपल कोंदण आपण जपायचं … आपल्या माणसासाठी :) So true

    ReplyDelete

Thank you for your comment :)