देव बसलेत

हो …. म्हणे देव बसलेत

पण हे देव का बसलेत ? कशासाठी ? घटस्थापना म्हणजे काय ?
आत्ता तुम्ही म्हणाल … घटस्थापना म्हणजे इतक काय अवघड आहे सांगायला ?

आईने शेतातून आणलेली २ दिवस चांगली वळवलेली काळी माती मडक्याभोवती गोळा करून रचायची आणि सगळी धान्य त्यात थोडी थोडी पेरायची …. झाल

अगदी बरोबर …. हेच करायचं . पण हे सगळ काय माहीत आहे ?


हे म्हणजे बळीराजाने धरणीमातेला घातलेलं साकड . काळ्या मातीत धान्य पेरून तो ९ दिवस वाट पाहतो कौल द्यायची . आता हा कौल वगैरे प्रकार कोकणात जास्त चालतो . माझ सासर कोकणातलं त्यामुळे हे सगळ मी पाहिलंय .

कौल मागायचा झालाच तर कोकणात एक प्रथा आहे . चांगल्या प्रसंगी देवाची आठवण काढून मंदिरात जायचं, आपल म्हणन पुजाऱ्याना सांगायचं मग पुजारी देवासमोर गाऱ्हाण मांडतो . मोठ्या आवाजात . जे काही असेल ते देवाच्या कानावर घालायचं . पुजाऱ्याकरवे .
कोकणी म्हणजे साधी माणस हो . पोटात एक अन ओठात एक नाही जमत त्यांना . नवस बोलायचं ते ही गावात सगळ्यांसमोर गाऱ्हाण मांडून हेच त्यांना माहीत . म्हणजे हे असं

रे म्हाराज्या ! बारा वहिवटीच्या म्हाराज्या !!
बा म्हाराजा रवळनाथा
आम्ही आज गाऱ्हाण घालतो . ता ध्यानात ठेव म्हाराजा !

हे देवा , ह्या दोन लेकरांचा नवा संसार उभा कर !
आमच्या ह्या गोतावळ्याक या नवीन पोरीक सुखी ठेव !
हेंची सदैव भरभराट होऊ दे !
तेंका उदंड आयुष दी !
ह्या जोडप्याक सुखी ठेव !
वेलिक लवकर फुल येवाक पाहिजे !
 असा आमचा तुका हात जोडून सांगणा !

शेवटी देवा,आमच्याकडून, काय चूक झाली असल्यास,
किंवा, काय तुझो उपम्रर्द, झालो असल्यास ,
किंवा,  तुझो आमकां, विसर पडलो असल्य़ास,
किंवा, वाडवडीलांचो, पुर्वजांचो ,किंवा, लहान मोठ्यांचो, आमच्या कोणाकडून, अपमान झालो असल्यास, चूक झाली असल्यास,  आमका सगळ्याक, क्षमा कर.

पुढ्ल्या वर्षी सुद्धा, तुझ्या पायाकडे येंवक, अशीच ताकद, आणि बुद्धी दी,ह्या,  तुका अखेरचा सांगणा !

 हे म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदा कुलदैवतास गेल्यावर माझ्या दिराने पुजाऱ्याकरवी आम्हा दोघांसाठी घातलेलं गाऱ्हाण :)
आणि पुजार्याच्या प्रत्येक वाक्यानंतर "व्हय म्हाराजा !" म्हणत स्वतःच्या समत्तीची जाहीर कबूलही द्यावी लागते

बाकी मूळ मुद्दा काय …. घटस्थापना म्हणजे एक गाऱ्हाणंच

सगळी धान्य घटात पेरून शेतकरी देवाच्या म्हणजे निसर्गाच्या कौलाची वाट पाहत ९ दिवस गाऱ्हाणं ऐकवतो .

" हे धरणीमाते ,
या वर्षी ज्या धान्याला वातावरण पोषक असेल ते धान्य घटात भरभरून येऊ दे
त्यानेच मी माझी जमीन पेरेन "

दिवस जसजसे पुढे सरकतील तसतशी हिरवी पाती घाटातून डोकावायला सुरु होतात आणि एखादाच कोंब सगळ्यात जास्त उंच वाढतो . हाच तो कौल निसर्गाचा :)

देवांना खाऊच्या पानावर बसवायचं आणि ९ दिवस निवांत वेळ द्यायचा .  मग जो काही त्या घटाचा कौल तीच पेरण करायची या वर्षीही . अगदी डोळे झाकून विश्वास ठेवून :)

म्हणे नवरात्र संपल्याशिवाय लग्नाची बोलणीही करत नाहीत . आता का ? तर हे अस …… financially आपण पुढच्या वर्षभरात किती stable असू त्यावर लग्नाचा खर्च अवलंबून …… बरोबर कि नाही ? मग पेरणी कुठली करायची यावर सुनेला किती दागिने घालायचे हे ठरवायचं :P

बाकी देवी आहेच आपल्यापाठी …… शक्ती द्यायला :)

सर्वाना नवरात्रीच्या शुभेच्छा :)

4 comments:

  1. इतके वर्ष घट बसवतोय … पण हा असा विचार कधीच नाही आला डोक्यात
    Interesting ..... :)

    ReplyDelete
  2. Thankyou so much Amruta for explaining this in detail❣️❣️❣️

    ReplyDelete
    Replies
    1. Happy to know you liked it ❤️

      Delete

Thank you for your comment :)