दिस शेवटचा


वाहून गेले सारे , घट्ट रोवलेली माती 
थांबवावे कुणी कुणाला असा एकही बांध राहीला नाही 

कोसळून भिजवायचा चिंब , आता मुसमुसतो त्या ढगात  
लपवावा ओलावा गालाचा इतका पाऊसही शांत राहीला नाही 

तुझ्या अंगणाशी झुकली रातराणी पण गंध राहीला नाही 
अन ती हुंगण्याचा मलाही आता छंद राहीला नाही 

सुटली आता गाठ , पुन्हा जुळणे नाही 
ऱ्हदयाला पडावा पीळ असा बंध राहीला नाही 

गेल्या विरून साऱ्या काळजातल्या जखमा 
आठवणीची उठावी कळ, असा वारा मंद राहीला नाही  

सरती मागे पाऊले , पुन्हा त्याचं भीतीने वेदनेच्या  
बेधुंद घ्यावा श्वास , इतका विश्वास नितांत राहीला नाही  

शब्दांच्या खेळात कधीचेच झाले बंद तुझे येणे 
कुठल्याच भावनेशी का तुझा संबंध राहीला नाही ?

गेली का सांग राहुनी , सरती भेट ही ती शेवटची 
बरंय …… दिस शेवटीचा म्हणून कुणी निंद्य राहीला नाही 

लाख झाल्या चुका , लाख गुन्हे केले 
पण …… 
सगळ्या पोटात घालण्याइतका मोठा एकदंत राहीला नाही 

सुखी तुझ्या घरी तू , मी आनंद माझ्या घरचा 
वळाव्या वाटा मागे , असा स्पंद राहीला नाही   

गोकुळ नांदते घरी बाळकृष्णाच्या पायी 
देवकी यशोदेचा कुठेही आता नंद राहीला नाही 

1 comment:

  1. pratyek goshiticha arth kay? yach uttar nahi deta yet...... :( kharach nahi hot g sahan ata...... :'(

    ReplyDelete

Thank you for your comment :)