ओठावरच हसर गाणं...देठासहित खुडून दिलस

          सुप्रभातीची कोवळी सूर्यकिरणे दवबिंदूच्या तलावात बुडवून पारिजाताच्या शब्दांची माणिकमोत्यांची कविता फुलपाखराच्या पंखांच्या ताम्रपत्रावर  लिहून  गुलाबाच्या करंडीतून तुझ्यापर्यंत पोहोचवावी म्हणून कितीतरी दिवसांनी आज पिसारा फुलवलाय .जे णे करून तुझ्या मनात भरून आलेले ढग एकदाचे बरसून जाऊ देत आणि पुन्हा एकदा आकाश निरभ्र होऊ दे . आकाशात हिरांची उधळण करणारा तो धवलमय तेजस्वी  चंद्र त्याच्या देखण्या चेहऱ्याच दर्शन घडवू दे . शुक्राची हि चांदणी तो पर्यंत त्याला साद घालील जोपर्यंत तिच्या काळोखाच्या कुशीत शिरून पाहिलेल्या सोनेरी स्वप्नांचा इंद्रधनू होत नाही .
          मातीच्या कुशीत सोन होवून उगवणाऱ्या सोनाचाफ्यालासुद्धा समाजात कि आपला सुगंध कुणालातरी हास्याचा खळखळणारा झरा होवून आपल्याबरोबर वाहून आणत .काळ्या पाषाणातून उद्या घेत उंचावरून कोशालानार्या धबधब्याला , कुणाच्यातरी वेड्या मनाला अल्लड व्हायला लावत . 'त्या ' च्या आठवणीने बैचेन करणाऱ्या 'तिला' भरकटलेला पाखरू परतून यावा तसं सार काही सोनचाफ्याच्या मिटलेल्या ओंजळीत सापडत. जिथं तिला खात्री असते , मिटलेल्या ओंजळीतील आठवणी जेव्हा उमलतील तेव्हा तिच्या फुललेल्या पायघड्यावरून नक्षत्राच्या पावलांनी तो तिच्यासाठी तिच्याकडे वाऱ्यासारखा धावत येईल . आणि मऊ धुक्याच्या पालखीतून तिला आपल्याबरोबर घेऊन जाईल . तुझ्यासारखे त्या सोनाचाफ्याला माझ्या हसणाऱ्या, रडणाऱ्या, लाजळूसारख्या रुसणाऱ्या, रागावाणाऱ्या चेहऱ्यावरचे भाव जरी वाचता येत नसले, जरी तुझ्यासारख्या भेदक नजरेने त्याला पाहता येत नसले तरी माझ्या नाजुकश्या मनात झालेला भावनांचा गुंता आणि तो सोडवताना माझ्या गालांवरून एकसारखे ओघळणारे थेंबांचे लयदार पण कुठेतरी जखमा करणारे , कुठल्यातरी जखमेवरची खपली काढणारे अश्रुंचे संगीत त्या सोनाचाफ्याला एका नजरेत कळले. पण तू .... धरीत्रीच्या आठवणीने व्याकुळ होऊन तिला भेटायला झुकलेल्या क्षितिजावरच्या आकाशासारख निस्सिम प्रेम राहू दे पण खडकावर आपटणार्या लाटेसारख एका क्षणाच आयुष्यही आज माझ्यासाठी आणल नाहीस.
         रोजचा उगवणारा दिवससुद्धा अनोळख्या प्रत्येक माणसासाठी     नवीन  प्रेम , नवा रंग , नवी आशा , नवीन आकाश , नवा सूर्य, नवा चंद्र  सारकाही न मागता आणून देतो पण तू मात्र आज धो धो कोसळणाऱ्या पावसात उभा राहून दुष्काळ पडल्याचा खोटा भाव आणलास
         एका दिवसाचा पाउस तुझा
         सगळ्याला बहार आला
         ओंजळ जरी भरलेली असली
         तरी हात आज तुझा
          रिकामाच राहिला
                     तुझ्या डोळ्यातील
                     माझ्या डोळ्याचं स्वप्न
                      बघायचाच राहून गेला
                      जरी चेहरा नाही दिसला तुझा
                      तरी मी तुला नखशिखांत पाहिलं

       तहानेने व्याकुळ झालेल्याच्या ओठापर्यंतचा पाण्याने भरलेला द्रोण जर काढून घेतला तर झालेल्या वेदनाही कमीच असतील. त्यापेक्षाही तीव्र अस्वस्थता आयुष्यात पहिल्यांदा अनुभवली . ज्याच्यासाठी अवसेच्या रात्रीही मि माझ्या भावनांचं चांदण अंथरल तो पौर्णिमेचा चंद्र माझ्या नकळत उगवला . इतरांनी त्याला पाहीला पण माझ्या समोर का ढगाआड गेला ? तक्रार करू ती कुणाकडे ? त्या चंद्राला आपल्या झगमगीत रजईत  लपवून इतरांचे दिवे मालवल्यावर बाहेर काढणाऱ्या सूर्याकडे कि आपल्या सुंदरशा शुभ्र महालाच्या मध्यावर असलेल्या तलावात लपायला जागा देणाऱ्या त्या ढगाकडे ?
        मै जिसे चाहती हू
        उसे जमानाभी चाहता है
        सोचा खुदासे शिकायत करू
        लेकीन खुदा भी उस से मोहोब्बत करता है 

    
        गळून पडणाऱ्या पिकलेल्या पानालाही झाड सावली देत ..... का ?? आज कळल .... कारण रस्ताकडे पाठ करून वाट पाहणाऱ्याच्या जखमा राक्ताबाम्बळ होऊन वाहत असतात. ज्या मला सहन झाल्या नसत्या . दूरपर्यंत पोहोचलेल्या पायवाटेवर उठलेल्या वावातालीसारख माझ येण, अगदी अचानक, अनपेक्षित, तितक्याच वेगात. त्या वावटळीत माझा तरी चेहरा दिसला का रे तुला ? एकदाही न पाळतात अतानालेल्या प्रत्यंचेवरून सुटलेल्या बाणासारखी निघून गेले . तुझ्या एका नजरेचीही अपेक्षा न  करता. अथांग पसरलेली सागरासारख शुध्द , अनंत , अभ्येद्य अशा तुझ्या प्रेमाचा साक्षीदार करून घेतलस मला 
        विचारणार नाही तुला
       तू मला काय दिलस
       ओठावरच हसर गाणं
       देठासहित खुडून दिलस
       हे काय थोडं केलस

       माथ्यावर  आलेल्या भास्करासारखा माझा तप्त राग या अश्रूसागरात बुडून मावळतीच्या किनाऱ्यावर येऊन शांत झाला . भर दुपारी सूर्य ढगांनी झाकालावा अशी तुझ्या चेहऱ्याची एक झलक , माझ्यासाठी आणलेल्या त्या तुझ्या डोळ्यातील आत्मीयता तुझ्या पाठमोर्या आकृती ऐवजी मिळाली असती तर प्रत्यंचेतून सुटलेल्या बाणाने उन्हात तुझ्यासाठी चांदण सांडलं असत . रिकाम्या राहिलेल्या तुझ्या हातात नक्षत्रांची वेल गुंफून  दिली असती . ऋषींनी समाधी लावली असा निश्चल उभा होतास . मला काय हवं आहे ? विचारावं ही वाटल नाही की खूप काही विचारायचं होतं, खूप काही सांगायचं होतं पण हिरव्यागार  लवलवणाऱ्या पात्यासारख न दिसायच्या आधीच अदृश्य झालेलं माझं येणंच तुला दिसलं नाही ? 
        पुढल्या वेळी येताना सूर्याकडून दिवे घेऊन ये. यावेळी तुझ्या समोरून येईन . पण त्या तेजाने माझे डोळे दिपणार नाहीत. एकच प्रार्थना करते या सुर्यणारायनाकडे .....
       'सूर्यदीपांच्या तेजाने माझ्या काळ्याभोर डोळ्यांच्या कडांवर येऊन  थांबलेल्यापैकी एकही दवबिंदू चमकू नये. त्यातला एकही दवबिंदू त्या भेदक  नजरेला दिसू नये '  


 

Be the first to reply!

Post a Comment

Thank you for your comment :)